विंचूरला कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय मार्फत स्वच्छता अभियान....
रयत शिक्षण संस्थेच्या विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या वतीने गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक यांनी गावातील बाजारपेठ, प्राथमिक शाळेचा परिसर, मंदिर परिसर व विद्यालयाच्या परिसरात स्वच्छता केली. यामध्ये विद्यालयातील इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांसह पर्यवेक्षक ज्ञानदेव जोरे, सतिश पगार व स्वच्छता अभियान प्रमुख संदीप वसावे सहभागी झाले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छ केला व कचरा संकलित करून त्याची योग्य विल्हेवाट लावली. तसेच विद्यालयाचे कलाशिक्षक विरेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियानावर आधारित चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. गावातील ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
No comments:
Post a Comment