*विंचूर विद्यालयात स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन....*
रयत शिक्षण संस्थेच्या विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्त्वाचे योगदान असलेले विंचूर गावातील स्वातंत्र्यसेनानी स्वर्गवासी जगन्नाथ रामनाथ पारीख, वेडू हरी शेलार, बाबुराव बाळाजी कापसे, गोविंद वैजनाथ महाजन, देविदास दामोदर काशीकर, व्यंकटेश हरी जोशी यांचे स्मरण करून अभिवादन करण्यात आले. सर्वप्रथम स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रतिमांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. संस्थेचे जनरल बॉडी सदस्य डॉ.सुजित गुंजाळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याची माहिती आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शरद महाजन यांनी विद्यार्थ्यांना इतिहासाची जाण ठेवून विज्ञान व अध्यात्माची कास धरा असे आवाहन आपल्या मनोगतातून केले. या कार्यक्रमासाठी स्वातंत्र्यसैनिकांचे वंशज व ज्येष्ठ नागरिक ओम पारीक, सुभाष कापसे, उत्तम शेलार, शरद महाजन, यशोदीप काशीकर, पर्यवेक्षक डी.टी.जोरे, प्राध्या. एस.एन. शेवाळे, उपशिक्षक व्ही.सी. भोसले, पी.ए. सरोदे, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संस्थेचे लाईफ मेंबर आर.के.चांदे यांनी केले.
No comments:
Post a Comment