कुमारावस्थेतील मुलींना संतुलित आहाराची गरज - डॉ. स्मिता तासकर
कुमार अवस्थेत मुला-मुलींमध्ये अनेक शारीरिक बदल घडून येतात. त्यामुळे त्यांना संतुलित आहाराची गरज असते, असे प्रतिपादन डॉ. स्मिता तासकर यांनी केले. विंचूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या समुपदेशन कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी कुमारावस्थेत होणारे शारीरिक बदल, मुलामुलींच्या अडचणी व समस्या, त्यासंदर्भात घ्यावयाची काळजी, शरीराला असलेली पाण्याची व व्यायामाची गरज अशा विविध मुद्द्यांवर सखोल असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे यांनी पुष्पगुच्छ देऊन व आपल्या अध्यक्षीय मनोगतातून डॉ. स्मिता तासकर यांचा गौरव केला. प्राध्यापिका सोनाली निकम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सविता गंधे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सविता गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमास प्राध्यापक मच्छिंद्र क्षिरसागर, ज्येष्ठ शिक्षिका विद्या कुलकर्णी, जयश्री काळे व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment