कर्मवीरांच्या त्यागातूनच रयत शिक्षण संस्था उभी राहिली - काशीराम जोपळे
रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेला 4 ऑक्टोबर रोजी शंभर वर्षे पूर्ण झाली. याप्रसंगी विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये शताब्दी महोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे व प्रमुख अतिथी रयत शिक्षण संस्थेचे लाइफ वर्कर राजेंद्र चांदे यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यानंतर सत्यम सोनवणे व शिवानी सांगळे या विद्यार्थ्यांनी कर्मवीरांच्या जीवनकार्यावर आधारित आपले मनोगत व्यक्त केले. विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक काशीराम जोपळे व उपमुख्याध्यापक वाल्मीक घोडके यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना, विस्तार, कार्यरत सेवक, कर्मवीरांचा संकल्प व जीवन कार्य याविषयी सविस्तर माहिती दिली तसेच कर्मवीरांच्या त्यागातूनच रयत शिक्षण संस्था आज उभी आहे व बहुजन समाजातील लाखो विद्यार्थी आज शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत याची जाणीव विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून करून दिली . या कार्यक्रमास पर्यवेक्षक सतिश पगार, ज्येष्ठ शिक्षक सुनिल गाडेकर, विद्या कुलकर्णी, अशोक खरात, अरविंद पाटील, पंकज सरोदे, बापू खरे, कैलास घंगाळे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन इयत्ता दहावीतील विद्यार्थी आयुष चव्हाण यांनी केले.
No comments:
Post a Comment