विंचूर विद्यालयात हरितसेना अंतर्गत पर्यावरण पूरक संक्रांत साजरी करण्याचा संकल्प....
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात हरितसेना व पर्यावरण अंतर्गत पर्यावरण पूरक संक्रांत साजरी करण्याचा संकल्प सर्व विद्यार्थ्यांनी केला. याप्रसंगी जेष्ठशिक्षक काशीराम जोपळे यांनी संक्रांत सणाचे महत्व सांगितले. तसेच या सणाला पतंग उडवण्यासाठी वापरला जात असणारा नायलॉन व चायनीज मांजा यामुळे कशा प्रकारे अपघात होतात, प्राणी व पक्षी याना इज़ा होऊन ते मृत्युमुखी पडून पर्यावरण धोक्यात येते याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. या नंतर विद्यालयातील हरितसेना प्रमुख निलेश बोरसे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक संक्रांत साजरी करण्याची शपथ सादर केली. मकर संक्रांतीच्या सणाला सुती दोरा वापरून पतंग उडविण्याचा संकल्प विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी केला. या कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे, उपमुख्याध्यापक वाल्मिक घोडके, पर्यवेक्षक सतिश पगार, ज्ञानदेव जोरे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment