परीक्षा काळात ताणतणावाचे व्यवस्थापन गरजेचे ---संजय धुर्जंड
विंचूर, १६ फेब्रु.- येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात नाशिक येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ.संजयजी धुर्जंड यांचे विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य जी.जी पोफळे होते. सर्वप्रथम प्रमुख वक्त्यांचा परिचय व कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे पर्यवेक्षक व्ही.व्ही.मापारी यांनी केले. त्यानंतर प्रमुख वक्ते डॉ.संजयजी धुर्जंड यांनी इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा कालावधीत ताणतणावाचे व्यवस्थापन व वेळेचे नियोजन कसे करावे, ध्येयनिश्चिती करून त्यादृष्टीने प्रयत्न करावे यासंबंधी अनमोल असे मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थी, शिक्षक, पालक यांची भूमिका स्पष्ट केली. याप्रसंगी सौ वर्षा मोरे,संजय शेवाळे (पं.समिती सदस्य, निफाड), सौ.अश्विनी गुंजाळ, उपमुख्याध्यापक प्रविण ढवण, पर्यवेक्षक एस.पी.पगार, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के.जी.जोपळे व आभार प्रदर्शन ए.एच.पाटील यांनी केले.
No comments:
Post a Comment