विंचूर विद्यालयाचा पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात व रक्षाबंधन संपन्न....
कोल्हापूर सांगली या भागात महापुरात सापडलेल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विंचूर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जवळपास 15 पोती जीवनावश्यक वस्तू - गहू, तांदूळ, डाळी, पीठ इ. जमा करून बाबा अमरनाथ फाउंडेशन लासलगाव यांच्याकडे सुपूर्त केली. याप्रसंगी बाबा अमरनाथ फाऊंडेशनचे सदस्य शोभराज बागमार, अनिल वाघ, वाल्मीक खैरनार, प्रताप वाघ, संतोष चौधरी हे उपस्थित होते. तसेच बहिण भावाचे पवित्र नाते असलेला रक्षाबंधन सण यावेळी साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या उपशिक्षिका एस.एस.जोशी यांनी रक्षाबंधन सणाचे महत्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य एन.ई. देवढे यांनी बहीण भावाचे पवित्र नाते जोपासणे व बहिणीचे संरक्षण करण्याबाबत विद्यार्थ्यांना उद्बोधन केले. याप्रसंगी विद्यालयातील इ. पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिनींनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना, शिक्षकांना तसेच विद्यालय परिसरातील वृक्षांना औक्षण करून राख्या बांधल्या. कार्यक्रमास उपमुख्याध्यापक डब्ल्यू.एन.घोडके, पर्यवेक्षक एस.पी.पगार, डी.टी.जोरे, ज्येष्ठ शिक्षक के.जी.जोपळे, पी.बी.आहेर एस.एम.पवार, एस.जे.बागुल पी.ए.सरोदे, के.एम.निकम , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रयत शिक्षण संस्थेचे लाइफ वर्कर आर.के.चांदे यांनी केले तर आभार प्रदर्शन व्ही.सी.भोसले यांनी केले.
No comments:
Post a Comment