आधुनिक युगात मुलांना प्रेम द्या, वेळ द्या- डॉ.संजय धुर्जंड
मुलांचे पालक म्हणून आपण बऱ्याच गोष्टी त्यांच्यावर लादत असतो. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मुलांना आवश्यक ते प्रेम व वेळ देण्यात पालक कमी पडताना दिसतात. त्यासाठी मुलांना समजून घेऊन त्यांना प्रेम द्या व वेळ द्या असे आवाहन डॉ.संजय धुर्जंड यांनी उपस्थित पालकांना केले. विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मानसिक ताणतणाव व मानसोपचार कार्यशाळेप्रसंगी "खरे पालकत्व" या विषयावर ते बोलत होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य एन.ई.देवढे यांनी केले व प्रमुख पाहुण्यांचा परिचय संस्थेचे लाइफ वर्कर आर.के.चांदे यांनी करून दिला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी वर्षा मोरे, डॉ.काकासाहेब तासकर, डॉ.सुजित गुंजाळ, डॉ. विकास चांदर, डॉ.सचिन जेऊघाले, डॉ.किशोर चौधरी, डॉ.सौरभ शेणगे, डॉ.सुभाष शेणगे, डॉ.राजेश कांगणे, डॉ.शरद फड, स्कूल कमिटी सदस्य - अनिल दरेकर, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष शंकर दरेकर, विनायक जेऊघाले, पालक व ग्रामस्थ अशोक दरेकर, अर्चना दरेकर, रवींद्र जाधव, मोनिका कल्याणकर, पी.के.जेऊघाले, प्रविण सालगुडे, ज्ञानेश्वर गाडे, ज्ञानेश्वर सोनवणे, आबा दरेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे.पी.पाटील व आभार प्रदर्शन एस.जे.बागुल यांनी केले.
No comments:
Post a Comment