आधुनिक युगातही वृत्तपत्रांचे स्थान कायम : प्राचार्य देवढे
विंचूर : भारतीय लोकशाहीत पत्रकारिता हा चौथा आधारस्तंभ असून, समाजातील चांगल्या वाईट घटना वृत्तपत्रा द्वारे समाजासमोर मांडल्या जातात. मोबाईल क्रांतीच्या युगातही वृत्तपत्रांचे स्थान कायम असल्याचे प्रतिपादन विंचूर विद्यालयाचे प्राचार्य एन.ई देवढे यांनी केले. येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात पत्रकार संघ नवीन कार्यकारिणी निवडीबद्दल पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. संघातील नुतन पदाधिकार्यांसह पत्रकार संघातील सदस्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन गायकवाड, उपाध्यक्ष जगन्नाथ जोशी तसेच ज्येष्ठ पत्रकार किशोर पाटील, डी.बी. काद्री, प्रकाश जाजू, भाऊसाहेब हुजबंद, संदीप शिरसाट, दिपक घायाळ यासह पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते . याप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन गायकवाड यांनी समाजासाठी असलेले विद्यार्थी-शिक्षक व पत्रकारांचे योगदान तसेच पत्रकार हा लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ असून समाजाचा आरसा आहे असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमास भागवत दरेकर, सुनिल क्षिरसागर, जनार्दन चव्हाण, भक्तराज चक्रे यांसह विद्यालयाचे प्राचार्य एन.ई. देवढे, उपमुख्याध्यापक डब्ल्यू.एन.घोडके, पर्यवेक्षक एस.पी.पगार, डी.टी.जोरे, ज्येष्ठ शिक्षक के.जी.जोपळे, ए.एन.साळुंके, एस.पी.गाडेकर, पी.ए.सरोदे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रयत शिक्षण संस्थेचे लाइफ वर्कर आर.के.चांदे यांनी केले तर आभार प्रदर्शन व्ही.सी.भोसले यांनी केले.
No comments:
Post a Comment