*एन.एम.एम.एस. परीक्षेमध्ये विंचूर विद्यालयाचे १७ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र.....*
विंचूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे या वर्षी एन.एम.एम.एस. परीक्षेत ४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी १७ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरले आहेत. या प्रत्येक विद्यार्थ्यास पुढील पाच वर्षासाठी प्रतिवर्षी १२००० /- रु प्रमाणे शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार आहे. तसेच १६ विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. विद्यालयातील श्रध्दा डुंबरे, मानस घायाळ, स्वप्निल हिलाल, प्रणाली शेवाळे, गौरी विभुते, सिद्धांत राऊत, अनिकेत बोरसे, कार्तिक दरेकर, सार्थक क्षिरसागर, पियुष निकम, वैष्णवी घटे, अवधूत सोनवणे, रोशन भोसले, वैष्णवी भोसले, सिद्धी शिरसाठ, वेदांत वाघ व दिव्या दरेकर या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले. विद्यालयाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक, विभागप्रमुख श्री.सारुक्ते यु.ए. मार्गदर्शक शिक्षक व्ही.सी.भोसले, ए.वाय.सावळे, ए.ए.पवार, ए.एस.वानखेडे, ए.जी.खरात यांचे रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन भगीरथजी शिंदे, स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष काकासाहेब गुंजाळ, जनरल बॉडी सदस्य डॉ.सुजित गुंजाळ, उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य सुनिल भाऊ मालपाणी, उपाध्यक्ष कैलास सोनवणे व सदस्य पंढरीनाथ दरेकर, जगदीश जेऊघाले, अनिल दरेकर, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक संघाचे सर्व कार्यकारिणी सदस्य, ग्रामस्थ, पत्रकार, तसेच विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे, उपमुख्याध्यापक आर.व्ही.शिंदे, पर्यवेक्षक डी.टी.जोरे, के.जी.जोपळे, लाईफ मेम्बर आर.के.चांदे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment