विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचा इयत्ता १० वी चा ९२.४४ % निकाल
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचा इयत्ता १०
वी एसएससी मार्च २०१८ परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेसाठी विद्यालयातील एकूण २७८ विद्यार्थी
प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी २५७ विद्यार्थी पास झाले पैकी १३६ विद्यार्थी विशेष
प्राविण्यासह, ८५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत व ५
विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले. विद्यालयाचा शेकडा निकाल ९२.४४ टक्के
लागला. विद्यालयात
प्रथम क्र. - कु.वाघ दीक्षा सुभाष - ४८१ गुण – ९६.२०
%
द्वितीय क्र – बोडके आदित्य अनिल
- ४७३ गुण – ९४.६० %
तृतीय क्र.- कु.कानडे ऋतुजा
बाजीराव - ४७१ गुण – ९४.२० %
तसेच तिने गणित
विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून उज्वल यश संपादन केले.
वरील विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शक शिक्षकांचे
विद्यालयाचे प्राचार्य श्री.पोफळे जी.जी., उपमुख्याध्यापक श्री.लाटे डी.सी., पर्यवेक्षक
श्री. पगार एस.पी., व स्कूल कमिटी अध्यक्ष श्री.काकासाहेब गुंजाळ, उपाध्यक्ष
श्री.कैलास सोनवणे, उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य श्री.सुनिलभाऊ मालपाणी व
श्री.नारायणे गुरुजी, तसेच सदस्य श्री.पंढरीनाथ दरेकर, श्री.गोपीनाथ ढवण,
श्री.बाळकिसन मालपाणी, श्री.जगदीश जेऊघाले, श्री.काशिनाथ शेवाळे,
श्री.जी.टी.जेऊघाले व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले
No comments:
Post a Comment