विंचुर विद्यालयात स्वामी विवेकानंद यांच्या जागतिक सर्वधर्मपरिषदेतील ऐतिहासिक भाषणाच्या १२५ वर्षाच्या पूर्ती निमित्ताने व्याख्यान.....
विंचूर विद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु.प्रियंका कानडे (विद्यार्थिनी कला ,वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय लासलगाव) हिने स्वामी विवेकानंद यांच्या जागतिक सर्वधर्मपरिषदेतील ऐतिहासिक भाषणाच्या १२५ वर्षाच्या पूर्ती निमित्ताने कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर मधील रयत गुरुकुलच्या विद्यार्थ्याना दिनांक ११/०९/२०१८ रोजी स्वामी विवेकानंदांची विश्वबंधुत्वाची संकल्पना स्पष्ट करुन सांगितली. नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या लोकांना विवेकानंदांच्या विचारांची असलेली आवश्यकता समजावली. या विद्यार्थ्यांमध्ये असणारा ध्येयवाद व युवकांबद्दलची असलेली आस्था उल्लेखनीय होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.के. चांदे यांनी केले तर आभार एम.एस.निकम यांनी मानले. या कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य जी.जी.पोफळे, उपप्राचार्य पी.जी.ढवण, पर्यवेक्षक एस.पी. पगार व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment